ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग ही हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा : डाॅ. जितेंद्र आव्हाड

ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग म्हणजे हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. अतिक्रमण विभागात बदली करून घ्यायची असेल तर ५ कोटी द्यावे लागतात, अशी माहितीही आव्हाड यांनी उघड केली आहे. स्वतःचे डम्पिंग ग्राउंड नाही,धरण नाही,सांडपाण्याची व्यवस्था नाही,क्लस्टर योजना पुढे सरकलेली नाही,त्यामुळे विकासाची दूरदृष्टी नसलेली माणसे नेतृत्व करतात त्याचे नाव त्या शहराचे नाव ‘ठाणे’ आहे अशी जोरदार टीका देखील आव्हाड यांनी ठाण्यातील सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
. सोमवारी ठाणे महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहात आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबार घेऊन ठाणे महापालिका आणि इथल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, मा. विरोधीपक्ष नेते शानू पठाण , कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात आले.

ठाण्यात नागरिक प्रचंड त्रस्त असून महापालिकेचा आणि काही लोकांचा मनमानी कारभार सुरु असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. मानपाडा परिसरात ८० लोकांचा क्लस्टरला विरोध असताना या नागरिकांवर जबरदस्तीने क्लस्टर योजना लादली जात आहे. ज्यांची घरे मोठी आहेत ते क्लस्टर योजनेत का जातील ? आतापर्यंत क्लस्टरच्या किती योजना यशस्वी झाल्या ? असे प्रश्न यावेळी आव्हाड यांनी उपस्थित केले. सात सात एकर जागा विकासकाला द्यायची आणि विकास करायला सांगायचा तो विकासक काय विकास करणार.ठाण्यात सर्व एसआरए योजना बंद आहेत. एसआरए योजनेचा समावेश जबरदस्तीने क्लस्टरमध्ये करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
गेल्या ४५ वर्षात ठाणेकरांसाठी धरण बांधता आले नाही. मी स्वतः शाई धारण आणले होते. ते का करू शकले नाही. २ हजार कोटींचे रस्ते बांधले जातात मग धारण का बांधता येत नाही असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. ठाणेकरांना पाणी नाही,ओसी देताना विकासकाला सांगितले जाते नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी तुमची, मग विकासक पाणी देण्यास सक्षम नसेल तर त्याला ओसी का दिली जाते ? यापुढे सर्व नवीन बांधकामांना ओसी देणे बंद करा अशी मागणी देखील आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे जनता दरबाराच्या माध्यमातून केली.गल्लो गल्ली कचरा आहे,पाणी नाही, अख्या शहरातील नाले सफाई ठप्प आहे,प्रत्येक तलवात सांडपाणी सोडले जाते मग मलनिस्सारणचा निधी गेला कुठे. गेल्या ४५ वर्षात वॉटर आणि गटारची सुविधा करता आली नाही,आणि आमची महापालिका श्रीमंत महापालिका आहे असे दाखवले जाते अशी टीका यावेळी आव्हाड यांनी केली.

यावेळेस मा. नगरसेवक राजेश खारकर, अरविंद मोरे,राजेश कदम, प्रशासन सरचिटणीस राजेश ज. साटम, रचना वैद्य, राजु चापले, राजु शिंदे, शिवा कालू सिंह, एकनाथ जाधव, राहुल भालेराव, समाधान साळवे, माधुरी सोनार, पुजा उदासी, मेहरबानो पटेल, मल्लिका पिल्ले, रिंकू सिंह, कैलास सूरकर, विशांत गायकवाड, महेश भाग्यवंत, सुनिल कुऱ्हाडे, इकबाल शेख, गणेश मुंडे, राहुल पाटील, जयेश पाटील, सुरेश सिंह, रत्नेश दुबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाण्यात जमीन बळकावण्याचे प्रकार वाढले

ठाण्यात जमीन बळकावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून अशाच एका मागासवर्गीय समाजातील एका महिलेच्या बाजूने न्यायालयात आणि महापालिकेचा निकाल लागूनही अहमद पठाण नावाच्या व्यक्तीने जबरदस्तीने त्यांचा जमिनीचा ताबा घेतला आहे. पोलीस यंत्रणाही त्यांना न्याय देत नसून या जनता दरबारात आलेल्या महिलेला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ताबा घेऊ असा इशारा यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

Leave a Comment